लता मंगेशकरांचं शेवटचं गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की बनले कोट्यवधी रील्स, मोदींशी आहे गाण्याचं खास कनेक्शन
लता मंगेशकर यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, थेट गाण्याचं कनेक्शन नरेंद्र मोदी यांच्याशी. आजही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हे गाणं आहे प्रचंड आवडीचं.

भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा आवाज ऐकला की देशभक्ती, आपुलकी आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आपल्या सुरेल आवाजाने तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हजारो गाण्यांना आवाज देणाऱ्या लता दीदींच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. मात्र, जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं कोणतं होतं, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, या गाण्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही जोडला जातो.
लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झालं. त्याआधी काही वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी गायनापासून काहीसं अंतर घेतलं होतं. 30 मार्च 2019 रोजी त्यांनी आपलं शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं होतं. ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ असं या देशभक्तीपर गीताचं नाव होतं. या गाण्यात लता मंगेशकर यांचा आवाज ऐकायला मिळतो. नंतर हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं.
‘सौगंध मुझे इस मिट्टी की’मध्ये सुखविंदर सिंह यांचाही आवाज
‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याची सुरुवात लता मंगेशकर यांच्या आवाजाने होते. त्यानंतर प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनीही या गीताला आपला आवाज दिला आहे. देशभक्तीची भावना जागवणारं हे गाणं आजही रसिकांमध्ये ऐकलं जातं. मात्र, लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील शेवटची रेकॉर्डिंग म्हणून या गाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्येही गाण्याचा समावेश
या गाण्याचं आणखी एक महत्त्वाचं कनेक्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ हे गीत नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्येही दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे लता मंगेशकर यांच्या शेवटच्या रेकॉर्डिंगचा संबंध नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकशी जोडला गेला.
लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी यांच्यातही विशेष नातं असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. त्यामुळे लता दीदींच्या शेवटच्या रेकॉर्डिंगला नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये स्थान मिळणं ही देखील एक विशेष बाब मानली जाते.
