
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)