
आपल्यापैकी अनेकांना सवय आहे जेवताना किंवा नाश्ता करताना फळे खाण्याची. बरेच लोक जेवण झाले की, लगेचच फळे किंवा फ्रूटचॅट खातात. मात्र, हे चुकीचे आहे.

नेहमी फळे खाताना एकटेच खा. जेवण किंवा नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करू नका. फळे खाल्ल्यानंतर 45 मिनिटे काहीही खाऊ नका.

अनेकांना फळे खाण्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे. मात्र, ही तुमची सवय चुकीची आहे. फळे खाल्ल्यावर आपण 45 मिनिटे काहीही खाल्ले किंवा पिले नाहीतर फळे काही वेळातच पचते आणि त्याचे सर्व फायदेही शरीराला मिळतात.

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज भासत नाही. याशिवाय फळांमध्ये यीस्ट असते, ज्यामुळे पोटात आम्ल तयार होते. पाणी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते.