
हिवाळ्याच्या हंगामात जवळपास सर्वांनाच गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. मात्र, असे केल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते आणि केस गळणेही सुरू होते. यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करा.

अनेकदा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांच्या मनाप्रमाणे केसांचा शॅम्पू वापरण्यास सुरुवात करतात. असे केल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना रात्री झोपण्याच्या अगोदर केसांना तेलाची मालिश करण्याची सवय असते. मात्र, यामुळे केसांना रात्रभर तेल राहते. यामुळे केस गळती होण्याची समस्या निर्माण होते.

असेही दिसून आले आहे की लोक केस वारंवार विंचरतात. यामुळे आपले केस कमकुवत होतात आणि सारखे गळतात.

बऱ्याच लोकांना दररोज केस धुण्याची सवय असते. मात्र, यामुळे केस गळती होते. दररोज केस धुणे टाळाच.