
कमी रक्तदाबामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सोडियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अधिक तळलेले आणि तुपाचे पदार्थ खाणे कमी केले पाहिजे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण आहारात अनेक प्रकारच्या फळांचा समावेश करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

किवीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि फोलेट असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

कलिंगड खाणे शरीरासाठी खूप चांगले असते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते, ते आपल्याला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम एमिनो अॅसिड आणि लाइकोपीन यासह इतर अनेक पोषक घटक देखील असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाते. आंबा अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्यामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटीन असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते. विशेष म्हणजे केळी खाल्ल्यावर बराच वेळ भूकही लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.