AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले

Sonam Wangchuk : 26 दिवसांनंतर उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचा आरोप होत आहे. यावरून आता वांगचुक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

'मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?' उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले
Sonam Wangchuk Video NewsImage Credit source: X
| Updated on: Jul 24, 2026 | 11:39 PM
Share

नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले होते. आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारसोबत डीलच करायची असती, तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनम वांगचुक संतापले

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची गुरुवारी मध्यरात्री भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले. मात्र, उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील केली असे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वांगचुक म्हणाले, ’26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर सरकारशी तडजोडच करायची असती, तर इतके दिवस उपोषण करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता.’

सोनम वांगचुक यांचा व्हिडिओ

अनेक लोकांचा पाठिंबा

दुसरीकडे 26 दिवसांचे उपोषण संपल्यानंतर काही जणांकडून त्यांचे कौतुक होत असले तरी मोठ्या संख्येने लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे. लोकांनी त्यांच्या राजकीय विश्लेषणाला काही काळ विराम द्यावा आणि या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांनी वैयक्तिक पातळीवर किती मोठी किंमत मोजली आहे, याचाही विचार करावा.

11 किलो वजन घटले

गीतांजली आंग्मो यांनी सांगितले की, 26 दिवसांच्या दीर्घ उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे तब्बल 11 किलो वजन कमी झाले असून, त्यांना सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टासाठी 26 दिवस उपाशी राहण्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. त्यांनी विश्रांतीऐवजी त्यागाची निवड केली, त्यामुळे त्यांचे 11 किलो वजन कमी झाले असून त्यात मसल्स मांसाचेही नुकसान झाले आहे. किमान एक दिवस तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी, त्यानंतरच त्यांच्यावर आपल्या अपेक्षा आणि राजकीय मतांचे ओझे टाकावे.’

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच