AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले

Sonam Wangchuk : 26 दिवसांनंतर उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचा आरोप होत आहे. यावरून आता वांगचुक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

'मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?' उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले
Sonam Wangchuk Video NewsImage Credit source: X
| Updated on: Jul 24, 2026 | 11:39 PM
Share

नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले होते. आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारसोबत डीलच करायची असती, तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनम वांगचुक संतापले

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची गुरुवारी मध्यरात्री भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले. मात्र, उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील केली असे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वांगचुक म्हणाले, ’26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर सरकारशी तडजोडच करायची असती, तर इतके दिवस उपोषण करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता.’

सोनम वांगचुक यांचा व्हिडिओ

अनेक लोकांचा पाठिंबा

दुसरीकडे 26 दिवसांचे उपोषण संपल्यानंतर काही जणांकडून त्यांचे कौतुक होत असले तरी मोठ्या संख्येने लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे. लोकांनी त्यांच्या राजकीय विश्लेषणाला काही काळ विराम द्यावा आणि या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांनी वैयक्तिक पातळीवर किती मोठी किंमत मोजली आहे, याचाही विचार करावा.

11 किलो वजन घटले

गीतांजली आंग्मो यांनी सांगितले की, 26 दिवसांच्या दीर्घ उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे तब्बल 11 किलो वजन कमी झाले असून, त्यांना सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टासाठी 26 दिवस उपाशी राहण्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. त्यांनी विश्रांतीऐवजी त्यागाची निवड केली, त्यामुळे त्यांचे 11 किलो वजन कमी झाले असून त्यात मसल्स मांसाचेही नुकसान झाले आहे. किमान एक दिवस तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी, त्यानंतरच त्यांच्यावर आपल्या अपेक्षा आणि राजकीय मतांचे ओझे टाकावे.’

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप