
जर आपल्याला अंगदुखीचा त्रास होत असेल तर आपण एका बादलीत पाणी गरम करून त्यात एक चमचा ताजे आले कापून टाका. त्याच पाण्याने अंघोळ करा. यामुळे अंगदुखीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

जर आपली त्वचा कोरडी असेल आणि निर्जीव दिसत असेल तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून आंघोळ करावी. यामुळे त्वचेचा कोरडेपणाही दूर होईल आणि त्वचेवर चमकही येईल.

जर तणाव असेल किंवा तणाव वाढला असेल तर तुम्ही पाण्यात लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब टाकून आंघोळ करावी. लॅव्हेंडर तेलाचा सुवासिक वास मनाला शांत करतो.

त्वचेला खाज सुटत असेल तर कपड्यात ओट टाकून ते बांधून पाण्यात बुडवून ठेवा. काही वेळ पाण्यात पडून राहू द्या, त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा. यामुळे खाज सुटण्याची समस्या दूर होईल.