थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायलाने होऊ शकतो लकवा आणि ब्रेन स्ट्रोक, मेंदूची घ्या अशी काळजी !!

| Updated on: Jan 24, 2022 | 9:22 PM

थंडीच्या दिवसात अनेकदा लोक पाणी कमी पीत असतात कारण की वातावरणामध्ये गारवा पसरलेला असल्याने अनेकांना तहान कमी लागते परंतु थंडीच्या दिवसांमध्ये पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. यामुळे बेन स्ट्रोक लकवा सारखे आजार आपल्याला होत नाही.

1 / 5
अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार

अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार

2 / 5
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर मनीष कुमार यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की, पाणी हे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते तसेच अनेक आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण सुद्धा पाणी करते. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, थंडीच्या दिवसांमध्ये कमीत कमी रोज अडीच लिटर पाणी प्यायला हवे सोबतच डॉक्टरांनी अनेकांना सल्ला दिला आहे की रात्री झोपताना पाण्याचा एक ते दोन ग्लास नियमित पिऊनच झोपायला हवे त्यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित राहते व शरीरामध्ये कोरडेपणा अजिबात जाणवत नाही.

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर मनीष कुमार यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की, पाणी हे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते तसेच अनेक आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण सुद्धा पाणी करते. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, थंडीच्या दिवसांमध्ये कमीत कमी रोज अडीच लिटर पाणी प्यायला हवे सोबतच डॉक्टरांनी अनेकांना सल्ला दिला आहे की रात्री झोपताना पाण्याचा एक ते दोन ग्लास नियमित पिऊनच झोपायला हवे त्यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित राहते व शरीरामध्ये कोरडेपणा अजिबात जाणवत नाही.

3 / 5
आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये पाण्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो अशा वेळी आपण कोणत्या प्रकारचे पाणी प्यायला हवे? कोणते पाणी आपल्या शरीरासाठी योग्य आहे असे विविध प्रश्न अनेकांना उद्भवत असतात. तसे पाहायला गेले तर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, थंड, गरम, कोमट जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे पाणी शक्य तितके प्यायला पाहिजे तसेच इतर अनेक तज्ञ मंडळी आपल्याला सल्ला देतात की सर्वसाधारणपणे रूम टेंपरेचर आधारावर पाणी प्यायला पाहिजे.

आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये पाण्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो अशा वेळी आपण कोणत्या प्रकारचे पाणी प्यायला हवे? कोणते पाणी आपल्या शरीरासाठी योग्य आहे असे विविध प्रश्न अनेकांना उद्भवत असतात. तसे पाहायला गेले तर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, थंड, गरम, कोमट जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे पाणी शक्य तितके प्यायला पाहिजे तसेच इतर अनेक तज्ञ मंडळी आपल्याला सल्ला देतात की सर्वसाधारणपणे रूम टेंपरेचर आधारावर पाणी प्यायला पाहिजे.

4 / 5
डॉक्टर मनिष कुमार यांनी सांगितले की, पाणी आपल्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन म्हणजेच शरीरातील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनची मात्रा सुरळीत करण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच अशा वेळी आपल्याला नियमितपणे पाणी पिणे गरजेचे आहे. जर आपण या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायलो तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.

डॉक्टर मनिष कुमार यांनी सांगितले की, पाणी आपल्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन म्हणजेच शरीरातील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनची मात्रा सुरळीत करण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच अशा वेळी आपल्याला नियमितपणे पाणी पिणे गरजेचे आहे. जर आपण या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायलो तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.

5 / 5
खरेतर शरीरामध्ये रक्ताची मात्रासोबतच रक्ताचे पातळ असणे सुद्धा गरजेचे आहे, अशामध्ये पाणी रक्त पातळ करण्यास साहाय्यभूत ठरते. पाणी आपल्या मेंदूतील पेशी एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी मदत करत असतात सोबतच जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पाडण्यासाठी सुद्धा मदत करते. आपल्या मस्तिष्कच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारे जे काही विषारी द्रव्य घटक पदार्थ असतात त्यांना बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये असते आणि म्हणूनच आपला मेंदू व्यवस्थित रित्या कार्य करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

खरेतर शरीरामध्ये रक्ताची मात्रासोबतच रक्ताचे पातळ असणे सुद्धा गरजेचे आहे, अशामध्ये पाणी रक्त पातळ करण्यास साहाय्यभूत ठरते. पाणी आपल्या मेंदूतील पेशी एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी मदत करत असतात सोबतच जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पाडण्यासाठी सुद्धा मदत करते. आपल्या मस्तिष्कच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारे जे काही विषारी द्रव्य घटक पदार्थ असतात त्यांना बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये असते आणि म्हणूनच आपला मेंदू व्यवस्थित रित्या कार्य करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे.