पारूच्या सत्याची सत्वपरीक्षा सुरू; मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर

पारूच्या नशिबात काय वाढून ठेवलंय? मारुतीची ही अवस्था पाहून अहिल्या कोणतं पाऊल उचलेल? आदित्य-पारूच्या लग्नाचं सत्य ऐकून अहिल्या आणि मारुती काय करतील, या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jul 17, 2024 | 11:47 AM
1 / 5
'पारू' या मालिकेत पारू पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. पण यावेळी ही लग्नगाठ कुठच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी नाही तर प्रत्यक्ष तिच्यासाठी बांधली जाणार आहे. अहिल्यादेवींनी पारू आणि हरीशचं लग्न ठरवलं आहे.

'पारू' या मालिकेत पारू पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. पण यावेळी ही लग्नगाठ कुठच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी नाही तर प्रत्यक्ष तिच्यासाठी बांधली जाणार आहे. अहिल्यादेवींनी पारू आणि हरीशचं लग्न ठरवलं आहे.

2 / 5
घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. लग्नाचे सगळे कार्यक्रम मारुतीच्या म्हणजेच पारूच्या घरासमोर होणार आहेत. हळद फोडण्याचा कार्यक्रम पारूच्या घरी सुरु होतो आणि तिथे पारू आपल्या पहिल्या लग्नाचं सत्य हरीश समोर उलगडण्याचं ठरवते.

घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. लग्नाचे सगळे कार्यक्रम मारुतीच्या म्हणजेच पारूच्या घरासमोर होणार आहेत. हळद फोडण्याचा कार्यक्रम पारूच्या घरी सुरु होतो आणि तिथे पारू आपल्या पहिल्या लग्नाचं सत्य हरीश समोर उलगडण्याचं ठरवते.

3 / 5
पारूच्या  मेहंदीसाठी खास पाहुणेही आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अहिल्या, दिशा आणि दामिनी आहेत. दिशा कार्यक्रमात खोळंबा घालायला जाते. परंतु अहिल्या सर्व संभाळून घेते.

पारूच्या मेहंदीसाठी खास पाहुणेही आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अहिल्या, दिशा आणि दामिनी आहेत. दिशा कार्यक्रमात खोळंबा घालायला जाते. परंतु अहिल्या सर्व संभाळून घेते.

4 / 5
मंदिरात देवदर्शनासाठी सगळे गेलेले असताना आदित्य हाच आपलं सर्वस्व आहे हे पारूला जाणवतं. हळदीच्या रात्री पारू हरीशला, आपल्या आणि आदित्यच्या लग्नाचं सत्य सांगते.

मंदिरात देवदर्शनासाठी सगळे गेलेले असताना आदित्य हाच आपलं सर्वस्व आहे हे पारूला जाणवतं. हळदीच्या रात्री पारू हरीशला, आपल्या आणि आदित्यच्या लग्नाचं सत्य सांगते.

5 / 5
पारूच्या तोंडून सत्य ऐकून, हरीश लग्नघर सोडून निघून जायचा निर्णय घेतो. लग्नाच्या आदल्यादिवशी मुलगा निघून गेल्याने सगळेच तणावात आहेत. आदित्य आणि प्रीतम त्याला शोधायला निघतात. आपल्या मुलीच्या आयुष्यात हा प्रकार पुन्हा घडल्याने मारुती आत्महत्येचा प्रयत्न करतो.

पारूच्या तोंडून सत्य ऐकून, हरीश लग्नघर सोडून निघून जायचा निर्णय घेतो. लग्नाच्या आदल्यादिवशी मुलगा निघून गेल्याने सगळेच तणावात आहेत. आदित्य आणि प्रीतम त्याला शोधायला निघतात. आपल्या मुलीच्या आयुष्यात हा प्रकार पुन्हा घडल्याने मारुती आत्महत्येचा प्रयत्न करतो.

Follow Us