
बऱ्याचदा आणि जवळपास सर्वांनाच साधारणपणे पाच ते सहाच्या दरम्यान भूक लागते. ही भूक अशावेळी लागते, ज्यावेळी आपण ऑफिसमध्ये असतो किंवा ऑफिसमधून निघालो असतो.

मग यादरम्यान काहीही जे मिळेल गडबडीत ते खाल्ले जाते. मात्र, यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही भूक अत्यंत महत्वाची आहे.

नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.

लोकांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सामोसे, जिलेबी, पाणीपुरी, वडापाव, कचोरी, तळलेले मोमोज आणि गोली भेळ या गोष्टी खाणे टाळावे.

दिवसभर जर तुम्ही डाएट करत असाल आणि संध्याकाळी अशा गोष्टींचे सेवन करत असाल तर ते धोकादायक नक्कीच आहे. यादरम्यान हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा.