एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ, अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा

बॉलिवूडमधील असा एक अभिनेता ज्याने चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बल 50 दिवस केली नव्हती अंघोळ. अभिनेत्याला पाहून घाबरायचे लोक. त्याच्या भोवती फिरायचे पक्षी.

| Updated on: May 11, 2026 | 4:39 PM
1 / 6
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील काही सीन हे आयकॉनिक ठरतात. असे सीन शूट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते. असाच एक सीन सध्या चर्चेत आला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील काही सीन हे आयकॉनिक ठरतात. असे सीन शूट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते. असाच एक सीन सध्या चर्चेत आला आहे.

2 / 6
चायना गेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा यशस्वी ठरला नसला, तरी त्यातील अनेक पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेषतः या चित्रपटातील खलनायक 'जगीरा'ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप सोडली होती. या भूमिकेमुळे अनेकांना शोले मधील गब्बर सिंहची आठवण झाली होती.

चायना गेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा यशस्वी ठरला नसला, तरी त्यातील अनेक पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेषतः या चित्रपटातील खलनायक 'जगीरा'ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप सोडली होती. या भूमिकेमुळे अनेकांना शोले मधील गब्बर सिंहची आठवण झाली होती.

3 / 6
जगीराची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश तिवारी यांनी आपल्या अभिनयाने अशी दहशत निर्माण केली होती की, चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्षे उलटल्यानंतरही लोकांना त्यांचे संवाद तोंडपाठ आहेत.

जगीराची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश तिवारी यांनी आपल्या अभिनयाने अशी दहशत निर्माण केली होती की, चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्षे उलटल्यानंतरही लोकांना त्यांचे संवाद तोंडपाठ आहेत.

4 / 6
चित्रपटात जगीरा हा डोंगराळ भागात राहणारा, अत्यंत क्रूर आणि निर्दयी दरोडेखोर दाखवण्यात आला होता. या भूमिकेला वास्तववादी स्वरूप देण्यासाठी मुकेश तिवारी यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

चित्रपटात जगीरा हा डोंगराळ भागात राहणारा, अत्यंत क्रूर आणि निर्दयी दरोडेखोर दाखवण्यात आला होता. या भूमिकेला वास्तववादी स्वरूप देण्यासाठी मुकेश तिवारी यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

5 / 6
माहितीनुसार, जगीराच्या लूकसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांना पूर्णपणे राकट, घाणेरडे आणि भयावह दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी केस आणि दाढीही अनेक दिवस कापली नव्हती. त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून ते सतत शरीरावर परफ्यूम फवारत असत.

माहितीनुसार, जगीराच्या लूकसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांना पूर्णपणे राकट, घाणेरडे आणि भयावह दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी केस आणि दाढीही अनेक दिवस कापली नव्हती. त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून ते सतत शरीरावर परफ्यूम फवारत असत.

6 / 6
शूटिंगदरम्यान ते इतके वास्तववादी दिसत होते की, अनेक लोक त्यांच्यापासून दूर राहायचे. डोंगराळ भागात शूटिंग सुरू असताना त्यांच्या भोवती चिल आणि कावळे घिरट्या घालत असल्याच्या गोष्टीही त्या काळात चर्चेत होत्या.

शूटिंगदरम्यान ते इतके वास्तववादी दिसत होते की, अनेक लोक त्यांच्यापासून दूर राहायचे. डोंगराळ भागात शूटिंग सुरू असताना त्यांच्या भोवती चिल आणि कावळे घिरट्या घालत असल्याच्या गोष्टीही त्या काळात चर्चेत होत्या.

Follow Us