मुंबई आणि उपनगरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची झोप उडाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी भरलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई आणि परिसरात आतापर्यंत तब्बल 250 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुढचे 24 तास आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई पालिकेने केलं आहे.
पावसामुळे शहरात अनेक भागांमध्ये पाणी भरलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे.
मुंबई तुबल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी भरल्याने
मुंबईत 254 वॉटरपंपद्वारे पाणी उपसा सुरु आहे, अशी माहिती आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. जिथे पाणी तुंबते, तिथे स्वत: पोहोचून आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबईतील दादर, वरळी, लालबाग परिसर जलमय झाला आहे. दीपक टॉकीज भागात दुकानात पाणी शिरलं आहे.
हिंदमाता परिसरातही गुडघ्यापेक्षा जास्त पाणी भरलं आहे. अंधेरी सब वे परिसरही जलमय झाला आहे. तर मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालयाच्या ओपीडीतही पाणी शिरलं आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची दाणादाण उडाली.
वरळी बीडीडी चाळीतली घराघरात पाणी शिरलं आहे. घरात गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिक हैरान झाले आहेत. अनेकजण बादलीने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर पावसामुळे पाणी भरल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रागा पाहायला मिळाल्या. तर रेल्वे ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी रस्त्यात अडकले.
पाहा आणखी फोटो