
मुंबई शहरात राहत असाल आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फिरण्यासाठी बाहेर पडला असाल तर सावध व्हा कारण पुन्हा एकदा जुहू बीचवर जेली फिश दिसून आला आहे.

नागरिक व पर्यटकांनी जेली फिशपासून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. जेली फिश हे विषारी असून त्यांच्या डंकांसाठी कुप्रसिद्ध आहेत. या विषारी फिशच्या दंशामुळे तीव्र खाज सुटणे आणि जळजळ आणि सूज येते. गेल्या वर्षीही पावसाळ्यात जेली फिश मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते.

याच्या डंखामुळे तीव्र खाज सुटणे व जळजळ व सूज येते. गेल्या वर्षीही पावसाळ्यात जेली फिश मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते. तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यात समुद्रकिना-यावर जेलीफिश जमा होतात, ही वेळ त्यांच्या पुनरुत्पादनाची असते, ज्यामुळे जेलीफिश मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसतात.

यासोबतच समुद्राने काळ्या रंगाचा टार बॉलही किनाऱ्यावर फेकला आहे. टार बॉल हा समुद्रातील घाण आणि समुद्रातील दूषित तेलाचा बनलेला असतो.

यापूर्वी समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून आले होते. त्यांच्या दंशामुळे अनेक लोक जखमी झाले होते.