AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?

फडणवीस राज्यपालांना… कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?

| Updated on: Aug 19, 2026 | 4:17 PM
Share

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना प्रकरणी युक्तिवाद करताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. चुकीचा व्हिप, विधानसभा अध्यक्षांचा ठाकरेंच्या प्रस्तावाविरोधातील निर्णय आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निवडणूक आयोगाचा निर्णय यावर त्यांनी आक्षेप घेतला. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे असून राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणे वागल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. चुकीचा व्हीप काढला जाणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले. ठाकरेंच्या बैठकीतील प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला होता, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्याविरोधात निर्णय दिला, यावर सिब्बल यांनी आक्षेप घेतला. अध्यक्षांनी शिंदेंना प्रक्रियेचा भाग का होऊ दिले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण कोर्टात असतानाही निवडणूक आयोगाने थेट निर्णय दिला, हा आरोप सिब्बल यांनी केला. २३ जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आल्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला.

सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य भाग म्हणजे, ‘विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा’ ही संकल्पना. विधिमंडळ पक्षाने शिंदेंना मुख्य नेता निवडले आणि ते पत्र राज्यपालांना दिले, ज्यांचा याच्याशी संबंध नव्हता, असा दावा सिब्बल यांनी केला. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणे वागल्याचा आरोपही त्यांनी केला. विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केल्याचे सांगत, सिब्बल यांनी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षासोबत सत्तास्थापन करण्यासारखे हे असल्याचे नमूद केले.

Published on: Aug 19, 2026 04:17 PM

Follow Us