चारधाम यात्रेबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ पाकिस्तानी नागरिकांना मोठा फटका
Pahalgam Terror Attack: 30 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेबाबत सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. या यात्रेत सहभागी होण्यास पाकिस्तानी हिंदूंना बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानी हिंदूंना चारधाम यात्रा करता येणार नाही.

चारधाम यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी नोंदणी केली आहे. यावेळी, चारधाम यात्रेसाठी अंदाजे 21 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी हिंदूंवर निर्बंध लादले आहेत.

सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानी हिंदूंना चार धाम यात्रा करता येणार नाही. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी हिंदूंना चार धामला जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामला भेट देण्यासाठी पाकिस्तानातून सुमारे 77 लोकांनी नोंदणी केली होती. यावेळी, चारधाम यात्रेसाठी अमेरिका, नेपाळ आणि मलेशियातील सर्वात जास्त भाविकांनी नोंदणी केली आहे.

चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणीची संख्या 21 लाखांच्या पुढे गेली आहे. ज्यामध्ये 24 हजार 729 परदेशी पर्यटकांनी नोंदणी केली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.

केंद्र सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांना व्हिसा न देण्याचा आणि भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 100 हून अधिक देशांतील लोकांनी चारधाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे.