
हिंदू धर्मात स्वास्तिक हे समृद्धी, सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतिक मानले जाते. घरात एखादा शुभप्रसंग असेल की घराच्या भिंतीवर आवर्जुन स्वास्तिक काढले जाते. मात्र कधीकधी विशिष्ट अशा प्रसंगी स्वास्तिक काढणे हे अशुभ मनले जाते.

स्वास्तिक हे जीवन, उर्जा, शुभारंभाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच स्मशानभूमीच्या ठिकाणी, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्वास्तिक काढू नये, असे म्हटले जाते. तसे केल्यास ते अशुभ समजले जाते.

चप्पल, बुट ठेवण्याची जागा, घराच्या प्रवेशद्वाराच्या खाली स्वास्तिक काढणे अशुभ मनाले जाते. स्वास्तिक हे एक पवित्र असे प्रतिक आहे. स्वास्तिकावर पाय देणे हे अपवित्रतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळेच बुट, चप्पल ज्या ठिकाणी ठेवले जाते, तेथे स्वास्तिक काढू नये असे म्हटले जाते.

टॉयलटेच्या दरवाजावर तसेच नाल्याजवळ स्वास्तिक काढू नये असे सांगितले जाते. तसे केल्यास ते अशुभ मानले जाते. एखाद्याचा मृत्यू झाला, श्राद्ध असेल तर अशा वेळी स्वास्तिक काढणे अशुभ मनाले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.