Suvendu Oath Ceremony : शपथविधी वेळी मोदींनी स्टेजवर एका वृद्ध आजोबांना मिठी मारली, त्यांचे आशीर्वाद घेतले, कोण आहेत ते?

Suvendu Adhikari Oath Ceremony : पश्चिम बंगालच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर आज भाजप सरकारचा भव्य शपथविधी सोहळा झाला. या प्रसंगी सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. भाजपसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या शपथविधी सोहळ्याला खास उपस्थित होते.

| Updated on: May 09, 2026 | 12:48 PM
1 / 5
यावेळी एक लक्षवेधी घटना पहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर येताच त्यांनी एका वृद्ध माणसाची गळाभेट घेतली. त्यांना मिठी मारली. त्यानंतर त्यांच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. मोदींनी त्यांना बराच वेळ प्रेमाने घट्ट मिठी मारली होती.

यावेळी एक लक्षवेधी घटना पहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर येताच त्यांनी एका वृद्ध माणसाची गळाभेट घेतली. त्यांना मिठी मारली. त्यानंतर त्यांच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. मोदींनी त्यांना बराच वेळ प्रेमाने घट्ट मिठी मारली होती.

2 / 5
त्यावेळी या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू तरळले. लगेच या घटनेची चर्चा सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात कोणाला मिठी मारली? ते व्यक्ती कोण होते? याची चर्चा सुरु झाली.

त्यावेळी या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू तरळले. लगेच या घटनेची चर्चा सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात कोणाला मिठी मारली? ते व्यक्ती कोण होते? याची चर्चा सुरु झाली.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप आत्मीयतेने ज्यांची गळाभेट घेतली त्यांचं नाव माखनलाल सरकार आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचं वय 98 वर्ष आहे. 1952 साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अटक झालेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप आत्मीयतेने ज्यांची गळाभेट घेतली त्यांचं नाव माखनलाल सरकार आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचं वय 98 वर्ष आहे. 1952 साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अटक झालेली.

4 / 5
 1980 साली भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांना पश्चिम दिनाजपुर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांच संघटन समन्वयक बनवण्यात आलं.

1980 साली भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांना पश्चिम दिनाजपुर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांच संघटन समन्वयक बनवण्यात आलं.

5 / 5
वर्षभराच्या आत त्यांनी 10 हजार कार्यकर्त्यांना भाजपशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 1981 पासून सलग सात वर्ष त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं.

वर्षभराच्या आत त्यांनी 10 हजार कार्यकर्त्यांना भाजपशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 1981 पासून सलग सात वर्ष त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं.

Follow Us