
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आंदोलक आज सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत.

शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.

सगेसोयरे शब्दावरुन सगळ अडलं होतं. कुणबीमधून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देताना या शब्दाचा समावेश करावा अशी त्यांची मागणी होती. ती मागणी सरकारने अध्यादेश काढून मान्य केली आहे.

नवी मुंबई वाशी येथील शिवाजी चौकात मराठा समाजाची सभा होणार आहे. कालप्रमाणे आजही येथे मराठा समाज मोठ्या संख्येने जमला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या जात आहेत.

राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.