Premanand Maharaj: आयुष्य सुखी हवंय? मग या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा
Premanand Maharaj: कुणाला सुखी व्हावे असं वाटत नाही? ही धावपळ या दोन शब्दांसाठीच तर सुरू आहे. पण आयुष्यात सुखी होण्यासाठी काही गोष्टी गुपित ठेवाव्यात असं म्हटल्या जातं. प्रेमानंद महाराज यांनी काय दिला सल्ला?

आयुष्यात सुखी होण्यासाठी सर्वांची गडबड सुरू आहे. आयुष्य सुरक्षित आणि शांत असावे यासाठी प्रत्येक जण धावपळ करत आहे. पण त्यासाठी दिखावा करणे आवश्यक नाही. तुमच्या सुखाचे प्रदर्शन करणे योग्य नाही. एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठा मनस्ताप देऊ शकते.

आयुष्यात सुखी होण्यासाठी, समाधान टिकवण्यासाठी छोटीशी चूक, ईर्ष्या नात्यात दुरावा आणू शकते. त्यामुळे काही गोष्टी सार्वजनिक करणे योग्य नाही. आयुष्यातील काही गोष्टी या खासगी ठेवणेच अधिक शहाणपणाचे असते. प्रेमानंद महाराज यांनी याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.

भजन, भोजन, खजिना आणि मैत्री या गोष्टी गुपित असाव्यात हे खरं आहे का, असा सवाल प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारला. त्यावर महाराजांनी भाविकांना मोठा सल्ला दिला. या चारही गोष्टीत खासगीपणा जपणे आवश्यक असल्याचे महाराज म्हणाले.

ते म्हणाले की काही गोष्टी सार्वजनिक करणे, दिखावा करणे दृष्ट लागण्यासारखं आहे. त्यामुळे उलट तुमचे नुकसान होईल. तुमच्याकडे दहा लाख रुपये आहे हे जर तुम्ही जाहीर केले तर हा पैसा फार काळ तुमच्याकडे टिकणार नाही. कोणी ना कोणी तुमच्याकडे पैसा मागेल

भजन आणि देवाची साधना सुद्धा अशीच आहे. तिचे प्रदर्शन करू नका. हा तुमचा आणि देवामधील मामला आहे. त्याचे प्रदर्शन केल्यास त्या उथळपणाचा काहीच लाभ मिळणार नाही. तुम्ही केवळ दिखाव्यासाठी हे करत असल्याचे समोर येईल आणि देवाच्या भक्तीत तुमचे मन रमणार नाही.

सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर साधेपणानं आयुष्य जगा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कृत्रिमपणा भरला तर त्यात तुमचे नुकसान होईल. आयुष्याचा आनंद घ्या. पण तो घेताना अतिरेक टाळा. प्रदर्शन टाळा. कारण त्याची दृष्ट लागू शकते. नाहक दिवंडी देऊन संकटं ओढावून घेण्यात काय हाशील असा सुखी आयुष्याचा मंत्र आहे.