Rahul Gandhi : आता लग्नाचं वय झालं, राहुल गांधींचं थेट विधान, हजारो तरुणींसमोर…नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांनी यावेळी पीपीटीच्या माध्यमातून महिला अत्याचार, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी मांडली. तसेच तरुणींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लढलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

| Updated on: Aug 22, 2026 | 8:49 PM
1 / 5
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात हजारो तरुणींशी संवाद साधला. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक तरुणींनी मंचावर जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात हजारो तरुणींशी संवाद साधला. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक तरुणींनी मंचावर जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

2 / 5
राहुल गांधी यांनी यावेळी पीपीटीच्या माध्यमातून महिला अत्याचार, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी मांडली. तसेच तरुणींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लढलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

राहुल गांधी यांनी यावेळी पीपीटीच्या माध्यमातून महिला अत्याचार, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी मांडली. तसेच तरुणींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लढलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

3 / 5
प्रत्येक 100 महिलांमधील 6 महिलांवर बलात्कार होतो. 29 टक्के महिलांवर हिंसाचार केला जातो. जमलेल्या एकूण तरुणींपैकी 80 टक्के तरुणींनी विनयभंगाच्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे, अशी आकडेवारी सांगितली.

प्रत्येक 100 महिलांमधील 6 महिलांवर बलात्कार होतो. 29 टक्के महिलांवर हिंसाचार केला जातो. जमलेल्या एकूण तरुणींपैकी 80 टक्के तरुणींनी विनयभंगाच्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे, अशी आकडेवारी सांगितली.

4 / 5
तसेच, यावेळी बोलताना मुलींबद्दल आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, असं सांगितलं जातं. मुलींच्या वयाचा, वेळेचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. 15 ते 29 वर्षांची मुलगी घरात 5.5 तास काम करते. त्याच घरात मुलगा फक्त 30 मिनिटे काम करतो, असा फरक सांगितला.

तसेच, यावेळी बोलताना मुलींबद्दल आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, असं सांगितलं जातं. मुलींच्या वयाचा, वेळेचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. 15 ते 29 वर्षांची मुलगी घरात 5.5 तास काम करते. त्याच घरात मुलगा फक्त 30 मिनिटे काम करतो, असा फरक सांगितला.

5 / 5
मुलगा घरी उशिरा येऊ शकतो. तो बाहेर जाऊ शकतो. पण मुलींना रात्री आठच्या आत घरी यावं लागतं. मुलांना तीन ते चार वेळा परीक्षा देता येते. परंतु मुलींना परीक्षेसाठी फक्त एकदाच संधी दिली जाते. तुझं लग्नाचं वय झालं आहे, लग्न कर असं सांगितलं जातं असा भेदभावही सांगितला.

मुलगा घरी उशिरा येऊ शकतो. तो बाहेर जाऊ शकतो. पण मुलींना रात्री आठच्या आत घरी यावं लागतं. मुलांना तीन ते चार वेळा परीक्षा देता येते. परंतु मुलींना परीक्षेसाठी फक्त एकदाच संधी दिली जाते. तुझं लग्नाचं वय झालं आहे, लग्न कर असं सांगितलं जातं असा भेदभावही सांगितला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us