शेकडो मनसैनिकांसह अमित ठाकरे यांची जागर पदयात्रा; मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक
Mumbai Goa Highway MNS Jagar Padyatra : 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून मनसेच्या आक्रमक पवित्रा; आठ टप्प्यात पदयात्रेचं आयोजन. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने मनसेच्या जागर पदयात्रेचा समारोप होणार आहे.
1 / 5

मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागच्या 17 वर्षांपासून रखडलेलं आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.
2 / 5

मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची पदयात्रा काढली आहे.
3 / 5

शेकडो मनसैनिक अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत चालत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं, ही मनसैनिकांची मागणी आहे.
4 / 5

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्नी मार्गी लागावा, यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरलेत. सरकारनं जागं व्हावं आणि हे काम लवकरात लवकर सुरू करावं, अशी मागणी मनसैनिक करत आहेत.
5 / 5

आज सकाळी जागर पदयात्रेसाठी अमित ठाकरे मुंबईतून पळस्पेसाठी रवाना झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं. नवी मुंबईत वाशी टोलनाक्यावर फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
Follow Us