
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा एक भाग बनली आहे. पती अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) याच्याशी झालेल्या वादामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप करत आहेत. अभिनव म्हणतो की, श्वेता त्याला आपल्या मुलास भेटू देत नाही.

श्वेताचे पहिले लग्नही फार काळ टिकले नव्हते. 2007 मध्ये ती पती राजा चौधरीपासून (Raja Chaudhary) विभक्त झाली होती.

आता श्वेता तिवारीचा पहिला पती अभिनेता राजा चौधरी याने तिच्या दोन्ही लग्नांवर भाष्य केले आहे आणि तिच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत करताना राजाने म्हटले आहे की, जर तिचे दोन्ही विवाह टिकले नाहीत, तर याचा अर्थ असा नाही की ती एक वाईट व्यक्ती आहे. तो म्हणाला, श्वेता चांगली पत्नी आणि एक चांगली आई आहे.

राजा चौधरी म्हणाला, श्वेताच्या आयुष्यात हे पुन्हा घडत आहे, त्यामुळे तिच्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. श्वेता एक चांगली आई आहे आणि एक चांगली पत्नी आहे. यात श्वेताचे दुर्दैव आहे की, तिच्याबरोबर सर्व काही पुन्हा एकदा घडत आहे आणि तिचे दुसरे लग्न टिकले नाही, याचा अर्थ असा नाही की ती एक वाईट व्यक्ती आहे.

श्वेताने अभिनवला आपल्या मुलाला भेटायला द्यावे, असेही राजा म्हणाला. मला यावर भाष्य करण्याची इच्छा नाही, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की वडिलांना मुलास भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना हे समजले पाहिजे की जोडपे म्हणून त्यांच्या नात्यात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात, पण वडील आपल्या मुलाला कधीही इजा करु शकत नाहीत. मी त्यांच्यात जे काही घडत आहे, त्यात मधे पडू इच्छित नाही.

अभिनवने नुकताच श्वेतावर आरोप केला होता की, ती ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये सहभागी होण्यासाठी केपटाऊनमध्ये गेली होती आणि तिने मुलाला मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले होते. आपल्या मुलाला भेटण्यासाठी तो अनेक हॉटेल फिरत असल्याचे देखील त्याने सांगितले.