
आपण बऱ्याचवेळा बोलताना ऐकले असेल की, पैसा हाच खरा मित्र असतो. जो तुम्हाला वाईट काळात साथ देतो. त्यामुळे नेहमी पैसांवर प्रेम करा. याने तुमचे जीवन सोपे तर होतेच, पण समाजात सन्मानही मिळतो.

जर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल तर तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कधीही खर्च करू नका. जे लोक अनावश्यक गोष्टींमध्ये पैसे वाया घालवतात त्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात.

जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर ते फक्त साठवू नका. जमीन, सोने इत्यादींमध्ये गुंतवणूक नक्की करा. वेळ आल्यावर गुंतवलेले हे पैसे तुम्हाला मोठा नफा मिळवून देतात.

चांगल्या कामात पैसा खर्च करावा. यातून गरीब आणि आजारी लोकांना मदत करा. याशिवाय मंदिर किंवा धार्मिक स्थळी दान करा. यामुळे जीवनात सकारात्मकता येते.

पैशाची कमतरता नसेल तर पैसा सामाजिक कार्यात खर्च करावा. हॉस्पिटल, शाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून लोकांना मदत करावी. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढते.