
हा लढा मुंबईसाठी आहे, जीवनाचा लढा आहे. आम्ही जंगलासाठी आणि आमच्या आदिवासींच्या रक्षणासाठी लढलो. आम्ही इथे असताना एकही झाड उन्मळून पडले नाही. प्रत्येक रात्री नव्हे तर ३-४ महिन्यांनी एकदा गाड्या देखभालीसाठी जातात असे मत आरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी झाले तेव्हा व्यक्त केले.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा आमच्यावर कितीही राग असला तरी तो शहरावर काढून नये, इथल्या विकास कामांवर काढू नये. अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप-सेना युती सरकारवर केली आहे.

जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, हवामान बदल आपल्यावर आहेत. आम्ही बांधकाम जंगलासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय बनवण्याचा प्रस्ताव दिला होता असेही त्यांनी सांगितले.

आरे वाचवाच्या मोहिमेत मोठ्या संख्येनं शाळकरी मुलेही सहभागी झाले होते

आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी टाळा वाजवत आरे वाचावा या विषयी जागृती केली.

आरे वाचवा अश्या आशयाचे फलक घेऊन अनेक फलक घेऊन पर्यावरणप्रेमीने आंदोलक या आरे बचावाच्या आंदोलनात सहभागी झाली होती.