AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार प्रकारच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, पश्चाताप होईल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की असे काही लोक असतात ज्यांना कधीही घरी बोलावलं नाही पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : या चार प्रकारच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, पश्चाताप होईल
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 7:16 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या कुटनीतीच्या बळावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला, आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी आपल्याला चाणक्य नीतीमधील अनेक उदाहरणं दिली जातात. चाणक्य यांचे विचार आजच्या परिस्थितीमध्ये देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात भिन्न भिन्न स्वभावाचे लोक राहत असतात. सर्वच लोक काही वाईट नसतात, परंतु जे लोक वाईट असतात त्यांच्यापासून तुम्हाला धोका होऊ शकतो. समाजात असे काही लोक असतात त्यांच्यापासून चार हात दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. तसेच अशा लोकांना चुकूनही घरी बोलावलं नाही पाहिजे, असे लोक जर वारंवार तुमच्या घरी येत असतील तर आजच तुम्ही सावध झालं पाहिजे, त्यांच्यामुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अशा लोकांना कधीही घरी बोलावू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

जो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसेल – चाणक्य म्हणतात ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नसाल, ज्या व्यक्तीला पहाताच तुमच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होते, अशा व्यक्तीला कधीही तुम्ही तुमच्या घरी बोलावू नका, कारण असा व्यक्ती कधी न कधी तुमचा विश्वासघात करेल. अशा व्यक्तीला तुम्ही घरी तर बोलावूच नका, मात्र तुमच्या मनात जर काही गुप्त योजना असतील तर अशा व्यक्तीसमोर त्या सांगू देखील नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तींना वाईट संगत असते, जो व्यक्ती दारू पितो, जुगार खेळतो, अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरी कधीही बोलावू नका, कारण माणसाला चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र वाईट गोष्टी माणूस लगेच आत्मसात करतो, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे कधीही वाईट संगत असलेल्या व्यक्तीला घरी बोलावलं नाही पाहिजे.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक हे स्वार्थी असतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री केली नाही पाहिजे, त्यांना कधीही घरी बोलावू नका, ते त्यांच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं.

नकारात्मक विचार – चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात, अशा लोकांना कधीही घरी बोलावू नका. कारण त्यांच्या नकारात्मककेचा परिणाम हा तुमच्यावरही होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी.
अशोक खरात प्रकरणात नवीन नाव समोर, बडा नेता कोण? दमानिया म्हणाल्या....
अशोक खरात प्रकरणात नवीन नाव समोर, बडा नेता कोण? दमानिया म्हणाल्या.....
चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप
चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप.
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही.
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर.
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?.
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.