AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला नमवलं. इंग्लंडने विजयासाठी 259 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून पूर्ण केलं.

IND vs ENG : पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
IND vs ENG : पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 14, 2026 | 11:16 PM
Share

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 47.5 षटकात सर्व गडी गमवून 258 धावा केल्या आणि विजयासाठी 259 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल. यापूर्वी भारताने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका 4-0 ने गमावली होती. या विजयामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल गेल्याने क्रीडाप्रेमींची चिंता व्यक्त केली आहे.

भारताचा डाव

इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 259 धावांचं आव्हान गाठताना भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्माने 21 चेंडूंचा सामना केला आणि 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीकडूनही अपेक्षाभंग झाला. त्याने फक्त 6 चेंडूंचा सामना केला आणि 5 धावा करून बाद झाला. अवघ्या 48 धावांवर 2 गडी तंबूत गेले होते. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 103 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. पण कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला आणि डाव पुन्हा गडगडला. शुबमन गिल 75 चेंडूत 80 धावांवर असताना तंबूत गेला. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला होता.

शुबमन गिलनंतर जबाबदारी श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदरवर आली. पण 35 धावांवर असताना श्रेयस धावचीत झाला आणि संघ अडचणीत आला. त्यानंतर आलेला केएल राहुल देखील फक्त 1 धाव करून तंबूत परतला. 160 धावांवर 4 गडी तंबूत होते. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतक ठोकलं. त्याच्या कामगिरीमुळे भारताचा विजय सोपा झाला.  वॉशिंग्टन सुंदरला अर्धशतकासाठी चार धावांची गरज होती  आणि विजयासाठी 3 धावा आवश्यक होत्या. वॉशिंग्टन सुंदरने षटकार मारला आणि विजयासह अर्धशतकही साजरं केलं.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ