AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील…

गणपती रेल्वे आरक्षणात ओपनिंग कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळताना मारामार होत आहे. या तिकीटांच्या आरक्षण प्रणालीत पारदर्शकात एक सूत्रीकरण दिसत नाही.त्याची थोडक्यात माहिती...

गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील...
| Updated on: Jul 15, 2026 | 12:30 AM
Share

गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात गणेश चतुर्थीच्या दोन ते दिन दिवस आधी जातात. कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वे जादा गाड्या सोडत असते. यंदा कोकण मार्गावरील नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण १३ जुलै पासून सुरु झाले आहे. यंदा नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत फुल झाले आहे. अनेक महत्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट फुल झाली असून हाती भलीमोठी प्रतिक्षायादी पडत आहे. गणपती रेल्वे आरक्षणात ओपनिंग कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही.

पारदर्शकता एकसूत्रीपणा नाही…

मुळात रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संख्येप्रमाणे,त्या एका डब्याच्या बर्थच्या संख्येप्रमाणे एकूण बर्थची संख्या आणि प्रत्यक्षात आरक्षणाच्या वेळी उपलब्ध बर्थची संख्या फारच कमी असते त्यामुळे काही सेकंदात तिकीट बुक करताना रिग्रेट असा संदेश येतो. उदा. 20111 मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये एकूण सर्व बर्थ 1069 आहेत. पण प्रत्यक्षात 469 बर्थचेच आरक्षण उपलब्ध असते.उरलेले VIP आणि तत्काळ बुकिंगसाठी राखीव असावे.पण मुद्दा हा आहे की असा राखीव कोटा एकूण बर्थच्या किती टक्के असतो ते स्पष्ट केलेले नाही. रिग्रेट होते वेळी नक्की शेवटचे वेटींग तिकीट किती असते 200, 300, 400 हे देखील स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या रेल्वे आरक्षणात आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय असेच दिसत अशी प्रतिक्रीया प्रवासी बळीराम राणे यांनी दिली आहे.

पुढील आरक्षण कधी आणि किती तारखेला…

गणेश चतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर कोकणकन्यासह अन्य नियमित धावणाऱ्या ट्रेनचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू झालेले आहे. तसेच गौरीच्या आगमनाला जाणाऱ्या कोकणवासीयांची संख्याही मोठी आहे. यंदा १७ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन आणि १८ सप्टेंबरला गौरीपूजन आहे. या १७ सप्टेंबरला सुटणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण १९ जुलै रोजी होणार आहे.

बाप्पाच्या आगमनाची ओढ चाकरमान्यांना लागली आहे. कोकणात किंवा गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आरक्षणाचे वेळापत्रक आले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या या महत्त्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा!

आरक्षण रोज सकाळी ठीक ८:०० वाजता सुरू होईल.

प्रवासाची तारीख ➡️ आरक्षण सुरू होण्याची तारीख:

११ सप्टेंबर (शुक्रवार) ➡️ १३ जुलै २०२६

१२ सप्टेंबर (शनिवार) ➡️ १४ जुलै २०२६

१३ सप्टेंबर (रविवार) ➡️ १५ जुलै २०२६

१४ सप्टेंबर (सोमवार – गणेश चतुर्थी) ➡️ १६ जुलै २०२६

१५ सप्टेंबर (मंगळवार) ➡️ १७ जुलै २०२६

१६ सप्टेंबर (बुधवार) ➡️ १८ जुलै २०२६

१७ सप्टेंबर (गुरुवार) ➡️ १९ जुलै २०२६

१८ सप्टेंबर (शुक्रवार) ➡️ २० जुलै २०२६

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन