AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जर तुमच्याही घरात आहे देवघर तर या नियमांचं आवश्य पालन करा, घरात येईल सुख, समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात देवघर असेल तर कही विशिष्ट नियमांचं पालन हे केलंच पाहिजे, त्यामुळे देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि घरात सुख समृद्धी येते. मात्र या नियमांचं पालन न केल्यास त्याचा उलटही परिणाम होऊ शकतो. चला तर मग या नियमांबद्दल जाणून घेऊयात.

Vastu Shastra : जर तुमच्याही घरात आहे देवघर तर या नियमांचं आवश्य पालन करा, घरात येईल सुख, समृद्धी
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 7:21 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घराची रचना कशी असावी, याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रात तुमचं देवघर कसं असावं याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील अशी काही ठिकाणं असतात, त्या ठिकाणावरून सदैव तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, अशी ठिकाणी ही घरात निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची केंद्रबिंदु असतात. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं देवघर. परंतु जेव्हा तुम्ही आपल्या घरात देवघर बनवून घेतात, तेव्हा काही विशिष्ट नियमांचं पालन करणं गरेजचं असतं, या नियमांच्या पालनामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नेहमी टिकून राहते आणि घरात सुख, समृद्धी येते. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं संरक्षण होते. चला तर मग हे नियम कोणते आहेत, आणि वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

दिशा – वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक वस्तू ही योग्य दिशेलाच ठेवली गेली पाहिजे, तरच तिचा अपेक्षित परिणाम होतो असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे देवघर बनवताना सर्वात आधी दिशा कोणती आहे ती लक्षात घ्या. तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं, कारण ईशान्य ही देवाची आवडती दिशा आहे. देवघराची रचना अशी असावी की तुम्ही जेव्हा पुजेसाठी बसणार आहात, तेव्हा तुमचं तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असलं पाहिजे.

प्रतिमा – देवघरामध्ये तुम्ही लाकडू, विविध धातू आणि संगमरवर यांच्यापासून बनवलेल्या देवांच्या मूर्ती ठेवू शकतात. देवघरात एका देवाची एकच प्रतिमा असावी, त्यापेक्षा अधिक असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. तसेच देवघरामध्ये कधीही तुमच्या पूर्वजांचे फोटो असता कामा नये.

देवघर कधीही जमिनीवर असू नये – वास्तुशास्त्रानुसार देवाचं स्थान हे सर्वोच्च असतं, त्यामुळे देवघर कधीही जमिनीवर ठेवू नका. देवघर हे नेहमी उचांवरच ठेवावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर देवघर हे जमिनीवर असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते.

स्वच्छता – हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, तुमचं देवघर जिथे आहे, तो भाग नेहमी स्वच्छ असावा. तिथे घरातील कचरा साचू देऊ नये. तसेच देवघराची नियमीत स्वच्छता करावी. देवघराच्या स्वच्छतेनंतर देवाची पूजा करावी. सायंकाळच्यावेळी देवाजवळ दिला लावावा, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.