इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना पाकिस्तानने गमावला तर विराट कोहलीचं नुकसान! असं आहे कनेक्शन
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आधीच तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानच्या हातून गेली आहे. आता क्लिन स्विप देण्याची तयारी आहे. पण हा सामना विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 9 सप्टेंबरला बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला लोळवलं होतं. त्यामुळे तिसरा कसोटी सामनाही आरामात जिंकतील अशीच स्थिती आहे. त्यात पाकिस्तानने सात खेळाडूंना बाहेर पाठवलं आहे. इतकंच काय तर कोचिंग स्टाफही बदलला आहे. (Photo: PTI)

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे हा बदल केल्यानंतरही संघ तिसरा कसोटी सामना जिंकेल का? हा प्रश्न आहे. पण पाकिस्तानने हा सामना गमावला तर त्याचा परिणाम विराट कोहलीवरही होईल. आता हे कनेक्शन काय आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. (Photo: PTI)

इंग्लंडचा संघ जो रूटच्या नेतृत्वात खेळत आहे. बेन स्टोक्सने निवृत्ती घेतल्यानंतर जो रूटच्या खांद्यावर पुन्हा जबाबदारी आली आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय जो रूटच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कर्णधार म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराट कोहलीच्या तुलनेत सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरेल. (Photo: PTI)

लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर जो रूटने विराट कोहलीची बरोबरी साधली होती. सध्या दोन्ही खेळाडूंच्या कर्णधारपद कार्यकाळाची आकडेवारी पाहता 14-14 विजय आहेत. विराट कोहलीने 22सामन्यात 14 सामने जिंकले होते. तर रूटने 35 सामन्यात 14 विजय मिळवले आहे. त्यामुळे इंग्लंडने जो रूटच्या नेतृत्वात पुढचा सामना जिंकला तर विराट कोहलीच्या पुढे निघून जाईल. (Photo: PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या नावावर ठआहे. त्याने 40 सामन्यात 25 विजय मिळवले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर बेन स्टोक्स असून त्याने 40 पैकी 21 सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: PTI)