IND vs BAN : हार्दिक पांड्याचं झंझावाती अर्धशतक, भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 च्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशसमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हार्दिक पांड्या झंझावाती अर्धशतकामुळे हे टार्गेट शक्य झालं. आता हे आव्हान रोखण्याचं भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 10:07 PM
1 / 5
भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 5 गडी गमवून 196 धावा केल्या. तसेच विजयासाठी 197 धावांचं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेती भारताची ही तिसरी मोठी धावसंख्या आहे.या मैदानात 180 च्या वरचं टार्गेट गाठणं कोणत्याही संघाला जमलेलं नाही.

भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 5 गडी गमवून 196 धावा केल्या. तसेच विजयासाठी 197 धावांचं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेती भारताची ही तिसरी मोठी धावसंख्या आहे.या मैदानात 180 च्या वरचं टार्गेट गाठणं कोणत्याही संघाला जमलेलं नाही.

2 / 5

सुपर 8 फेरीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून हार्दिक पांड्याने अर्धशतक पूर्ण केलं. 27 चेंडूत हार्दिक पांड्याने आपलं अर्धशतकं पूर्ण केलं.

3 / 5

हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला बळ मिळालं. भारताला 5 गडी गमवून 196 धावांपर्यंत मजल मारता आली.

4 / 5

भारताच्या डावानंतर हार्दिक पांड्याने आपलं मतही व्यक्त केलं. "या खेळपट्टीवर 180 धावा भरपूर आहेत. पण आम्ही 197 धावा केल्या. आमचे गोलंदाज या धावा रोखण्यात यशस्वी ठरतील. दुबेसोबत चांगली भागीदारी जमली. काही वेळ थांबून खेळलो. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा जोरदार प्रहार केला.", असं हार्दिक पांड्या म्ह

5 / 5

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us