IPL 2023 | यशस्वी जयस्वाल ते रिंकू सिंह, या 5 खेळाडूंनी ठोठावलाय टीम इंडियाचा दरवाजा, कुणाला मिळणार संधी?
आयपीएलमुळे आतापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. आयपीएलने या खेळाडूंना मालामाल केलं. तसेच आयपीएलमुळेच अनेकांना टीम इंडियात प्रवेश मिळालाय.


राजस्थान रॉयल्स टीमच्या यशस्वी जयस्वाल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 11 मे रोजी 98 धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला जिंकवलं. यशस्वीने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 575 धावा केल्या आहेत.

रिंकू सिंह याने केकेआर टीमला गुजरात टायटन्स विरुद्ध अशक्य असा विजय मिळवून दिला. रिंकूने 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकून गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

तिळक वर्मा याने या मोसमात मुंबई इंडियन्सकडून 9 सामन्यात 274 धावा केल्या आहेत. नाबाद 84 हा तिळकचा त्याचा हायस्कोअर आहे.

केकेआर टीमच्या सुयश शर्मा याने 8 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. सुयशला अजून आपली छाप सोडता आली नसली तरी त्याने लक्ष वेधून नक्कीच घेतलंय.

सनरायजर्स हैदराबाद टीमच्या मयंक मार्कंडे याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. मयंकने आपल्या लेग स्पिनच्या मदतीने दिग्गजांना प्रभावित केलं आहे. त्यामुळे आगामी काळात निवड समिती या 5 जणांपैकी कुणाला संधी देतं, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.