वास्तुनुसार स्वयंपाकघरात कधीही ‘या’ 3 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा निर्माण होतील आर्थिक अडचणी
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला घराचे हृदय मानले जाते. हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून, कुटुंबाच्या आरोग्य, सुख-शांती आणि समृद्धीशी थेट जोडलेले स्थान आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील या 3 गोष्टी कधीही संपू देऊ नका.

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाकघर हे फक्त स्वयंपाक करण्याचे ठिकाण नाही तर ते असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आणि सौभाग्य जोडलेले आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. काही वास्तु नियमांनुसार स्वयंपाकघरात तीन वस्तू आहेत ज्यांचे भांडे कधीही रिकामे नसावेत. जर या वस्तू पूर्णपणे संपल्या तर ते केवळ नकारात्मकता आणत नाही तर समृद्धी देखील थांबवते. चला तर मग कोणत्या 3 गोष्टी आहेत जे स्वयंपाकघरात कधीच संपवू नये. याबद्दल जाणून घेऊयात.
1. हळद
स्वयंपाकघरातील हळदीचा डबा कधीही रिकामा नसावा. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हळदीचा संबंध गुरु देवाशी जोडला जातो. गुरु हा आपल्या मुलांना सन्मान, संपत्ती आणि आनंद देणारा ग्रह आहे.
जेव्हा स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपते तेव्हा ती गुरु दोषाचे लक्षण मानली जाते. यामुळे शुभ घटनांमध्ये अडथळा येऊ शकतो आणि घरातील सदस्यांचे भाग्य कमकुवत होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार हळद संपणे म्हणजे तुम्ही तुमची समृद्धी धोक्यात घालत आहात.
2. मीठ
मीठाशिवाय कोणताच पदार्थ चविष्ट लागत नाही आणि वास्तुनुसार मीठाशिवाय स्वयंपाकघर अपूर्ण असते. मीठ राहू आणि केतूचा प्रभाव कमी करते असे मानले जाते.
प्राचीन मान्यतेनुसार जर मिठाचा डबा पूर्णपणे रिकामा झाला तर घरात वास्तुदोष वाढतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. असेही म्हटले जाते की कधीही इतरांकडून मीठ उधार घेऊ नये किंवा स्वतःच्या घरात असलेले मीठ पूर्णपणे संपवू देऊ नये. मिठाची कमतरता घरात आर्थिक अडचणी दर्शवते.
3. तांदूळ
तांदळाला “अक्षत” म्हणतात, ज्याचा अर्थ “कधीही न संपणारा.” तर तांदूळ हे शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र आपल्या जीवनात भौतिक सुख, समृद्धी आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
स्वयंपाकघरातील तांदूळ पूर्णपणे संपल्याने शुक्राचा अशुभ प्रभाव पडतो. यामुळे घरातील शांती आणि आनंद भंग होऊ शकतो आणि संचित संपत्तीचा नाश होऊ शकतो. अन्नपूर्णा देवींचे आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी, तांदळाच्या भांड्यात तांदूळ रिकामे होण्यापूर्वी ते पुन्हा भरणे महत्वाचे आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
