
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्याच्या चौथ्या दिवशी जम्मू काश्मीरने सामन्यावर पूर्ण पकड मिळवल्याचं दिसत आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी जम्मू काश्मीर इतिहास रचणार हे आता स्पष्ट झालं आहे. (फोटो- पीटीआयो)

जम्मू आणि काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 584 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचा पहिला डाव 293 धावांवर आटोपला. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरला 291 धावांची मोठी आघाडी मिळाली. खरं तर गोलंदाज आकिब नबीमुळे हे शक्य झालं. (फोटो- मनी 9 वरून)

जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीनने या डावात शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे कर्नाटकचा संघ बॅकफूटवर गेला. आकिब नबीने 23 षटकांत फक्त 54 धावा देत 5 बळी घेतले. केएल राहुल, करुण नायर, मयंक अग्रवाल, शिखर शेट्टी, स्मरण रविचंद्रन या विकेट काढल्या. (फोटो- पीटीआय)

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत आकिब नबीने 10 सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. इतर सर्व गोलंदाजांमध्ये सर्वाधिक आहेत. प्रत्येक मोठ्या सामन्यात संघासाठी सामना जिंकवणारा खेळाडू असल्याचे सिद्ध करत आहे. (फोटो- टीव्ही 9 तेलुगूवरून)

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एकूण 12 बळी घेतले. त्याने उपांत्य फेरीतही 9 बळी घेतले आणि आता त्याने अंतिम सामन्याच्या पहिल्या डावातही आपली छाप पाडली आहे. आकिब नबीच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. (फोटो- मनी 9 वरून)