T20 World Cup 2021 अंतिम टप्प्यात, सेमीफायनलमधील संघ आले समोर

भारतीय संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. सुरुवातीचे सामने पराभूत झाल्यामुळे पुन्हा स्पर्धेत पुनरागमन करु शकला नाही. भारत असणाऱ्या गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 11:50 PM
1 / 5
यंदाचा विश्वचषक भारतासाठी अतिशय खराब गेला. पहिले दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत मागे पडला. भारत असणाऱ्या गटातून पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंड हे दोन्ही संघ पुढील फेरीत गेले असल्याने भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहचलेले चार संघ समोर आले आहेत.

यंदाचा विश्वचषक भारतासाठी अतिशय खराब गेला. पहिले दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत मागे पडला. भारत असणाऱ्या गटातून पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंड हे दोन्ही संघ पुढील फेरीत गेले असल्याने भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहचलेले चार संघ समोर आले आहेत.

2 / 5

भारत असणाऱ्या गटातून सर्वात आधी सेमीफायनलमध्ये गेलेल्या पाकिस्तान संघाने सर्वात उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी 5 पैकी 5 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे.

3 / 5

पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे, त्यांनी मात्र 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह पुढील फेरी गाठली आहे.

4 / 5

पाकिस्तानप्रमाणे सर्वात उत्तम कामगिरी ग्रुप 1 मधून इंग्लंडने केली आहे. त्यांनी 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे.

5 / 5

ग्रुप 1 मधून इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा संघही 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले असल्याने तोही सेमीफायनलमध्ये पोहचले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us