
कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

मालिका गमवण्यासोबत हार्दिक पांड्या यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण अंतिम साम्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.