पाकिस्तान क्रिकेटची वाट लागण्याचं कारण काय? पीसीबी आणि बीसीसीआयमधील फरक समजून घ्या
पाकिस्तान क्रिकेटची मागच्या काही वर्षात पुरती वाट लागली आहे. परिस्थिती सुधारत आहे अशी स्थितीही दिसत नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर संपून जाईल, असं बोललं जात आहे. या निमित्ताने पीसीबी आणि बीसीसीआयमधील फरक समजून घेऊयात...

पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाजूक स्थिती आहे. प्रत्येक सामन्यातील पाकिस्तानची कामगिरी पाहता असंच म्हणावं लागेल. पण पाकिस्तानची अशी स्थिती होण्याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तान संघाच्या कामगिरीत नाही तर पीसीबीत मिळेल. (Photo: PTI)
पाकिस्तान क्रिकेटची नाजूक स्थितीचं कारण पीसीबीच्या आतच दडलं आहे. पीसीबी आणि बीसीसीआयमधील फरक समल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कारण दोन्ही देशांच्या क्रिकेटमध्ये बराच फरक आहे. नेमकं काय ते समजून घ्या. (Photo: PTI)
भारतात बीसीसीआयच्या अधिपत्याखाली क्रिकेटची कारकिर्द सुरू आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी क्रिकेट फिल्डवर लोकांना प्राधान्य दिलं जातं. रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. सौरव गांगुलीने कर्णधारपदही भूषवलं आहे. आता बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास आहेत. ते माजी क्रिकेटपटू आहेत. (Photo: PTI)
पीसीबीच्या चेअरमनपदी पाकिस्तान माजी क्रिकेटपटू नाही तर माजी मुख्यमंत्री, पत्रकार आणि उद्योगपतींना प्राधान्य दिलं जातं. पीसीबीचे सध्याचे अध्यक्ष मोहसिन नकवी आहे. ते माजी मुख्यमंत्री आणि पत्रकार होते. त्यांचं क्रिकेटशी काही देणं घेणं नव्हतं. नकवी यांच्यापूर्वी अशरफ जका होते. ते बँकर आणि उद्योगपती होते. नजम शेट्टीही माजी मुख्यमंत्री आणि पत्रकार होते. (Photo: PTI)
देशाच्या क्रिकेटच्या दौऱ्या राजकारणी आणि उद्योगपतींच्या हाती असल्या की असं होणं सहाजिकच आहे. इतकंच काय तर त्यांना क्रिकेटचं अबकडही माहिती नाही. त्यामुळे क्रिकेट कमी आणि राजकारणच जास्त होत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचं क्रिकेट लयाला जात असल्याचं दिसत आहे. (Photo: PTI)