
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर अचानक ऑस्ट्रेलियला रवाना झाले आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

रोहित शर्माचा फॉर्म सध्या खूपच वाईट आहे. त्याने बॉर्डर गावस्कर मालिकेतील 4 डावात फक्त 22 धावा केल्या आहेत. तसेच कर्णधारपदाच्या डावपेचातही फेल गेला आहे. त्यामुळे सर्व चित्र विरोधात असल्याचं दिसत आहे.

खराब फॉर्म आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे त्याचावर टीक होत आहे. दरम्यान, अजित आगरकर मेलबर्नला गेले आहे. त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटायला नको.

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाचे दोन वरिष्ठ खेळाडू निवृत्त होणार असल्याची बातमी होती. या वृत्ताला दुजोरा देण्यासाठी रविचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यभागी निवृत्ती जाहीर केली. सध्या संघातील सर्वात सीनियर खेळाडू म्हणजे रोहित शर्मा.

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत एन्ट्री मारली तर मग हा सामना शेवटचा ठरू शकतो. पण टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही तर मात्र शेवटच्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.