
विवाहीत स्त्रियांसाठी करवा चौथाच्या उपवासाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी पूजा केली जात्. यावर्षी 10 ऑक्टॉबर 2025 रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हा उपवास केला जाईल. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, यावर्षी करवा चौथाचा दिवस विशेष आहे कारण चतुर्थी तिथीला दोन महत्त्वाचे ग्रह, सूर्य आणि चंद्र, यांचे राशी गोचर होत आहे. 10 ऑक्टॉबर 2025 रोजी सकाळी 1 वाजून 22 मिनिटांनी चंद्रदेव वृषभ राशीत गोचर करतील, तर रात्री 8 वाजून 19 मिनिटांनी सूर्य कन्या राशीत असताना चित्रा नक्षत्रात गोचर करेल.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते, जो मान-सन्मान, ऊर्जा, नेतृत्व क्षमता, वडील, सरकारी नोकरी, आत्मविश्वास आणि आरोग्याचे प्रतिनिधित्व करतो. तर चंद्रदेव मन, माता यांच्याशी नाते, मानसिक स्थिती, सुख आणि चांगली वाणी यांचे दाता आहेत. चला जाणून घेऊया करवा चौथाला सूर्य-चंद्राच्या गोचरामुळे कोणत्या राशींना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

करवा चौथाच्या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. जर तुम्ही कोणावर नाराज असाल, तर समोरची व्यक्ती तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला हव्या त्या भेटवस्तू देईल. तरुण वर्ग नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकतात, ज्यामध्ये कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य आणि साथ मिळेल. नोकरदारांना नवीन कंपनीसोबत काम करण्याची ऑफर मिळेल. 10 ऑक्टॉबरनंतर वृद्धांचे आरोग्य किंचित सुधारेल. व्यावसायिकांनी जर एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार केला असेल, तर डील पक्की होऊ शकते.

करवा चौथानंतरचा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक बाबतीत चांगला असेल. तरुणांना जर काही नवीन शिकायचे असेल, तर त्यात कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना येत्या काही दिवसांत कामाच्या ठिकाणी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. व्यावसायिकांसाठीही हा काळ अनुकूल असेल. वृद्धांना मुलांसोबत एकट्याने वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यातील दुरावा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. याशिवाय, कुंडलीत सोने खरेदी करण्याचा योग आहे.

वृषभ आणि कर्क राशीव्यतिरिक्त तुळ राशीच्या लोकांसाठीही येणारा काळ अनुकूल असेल. जर विचारपूर्वक जमिनीचा सौदा केला, तर काही काळात सर्व नुकसान भरून निघेल. व्यावसायिकांचे आर्थिक बाजू मजबूत राहील. ज्यांच्या लग्नाला फार काळ झाला नाही, ते आपल्या नात्यात एक पाऊल पुढे जाऊ शकतात. तरुणांचे जर आईशी बोलणे बंद असेल, तर पुन्हा संवाद सुरू होईल. घरात आनंदाचे वातावरण राहिल्याने वृद्धांना आनंद वाटेल. तसेच, आरोग्यात चांगले राहिल.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)