
सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची जगभरात चर्चा आहे. या स्पर्धेत भारत जेतेपद जिंकणार का? याची समस्त भारतीयांना उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेत भारतासोबतच पाकिस्तान या संघाचीही तेवढीच चर्चा आहे. हा संघ सेमीफायनलमध्ये जाणार का? असे विचारले जात आहे.

पाकिस्तान या स्पर्धेच्या बाहरे पडण्याची दाट शक्यता आहे. परंतु काही समीकरणं जुळून आले तर पाकिस्तान हा संघदेखील थेट सेमीफायनलपर्यंत मजल मारू शकतो. अंतिम चार संघात पाकिस्तान स्थान मिळवू शकतो. मात्र हे घडून येण्यासाठी नेमकं काय होणं आवश्यक आहे, ते समजून घेऊ या...

भारताचा सुपर-8 मधील शेवटचा सामना श्रीलंकेविरोधात होणार आहे. परंतु पाकिस्तानचे भविष्य फक्त याच सामन्यावर अवलंबून नाही. तर इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यातील सामन्यावरही पाकिस्तानचे भवितव्य आहे. 72 जानेवारी रोजी इग्लंड आणि न्युझीलंड यांच्यात लढत होणार आहे.

या सामन्यात न्युझीलंडचा मोठा पराभाव व्हायला हवा. तसेच पाकिस्तानला श्रीलंकेने दिलेले आव्हान 13.5 षटकांतच पूर्ण करावे लागेल. या सर्व बाबी जुळून आल्या तर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो.

या सर्व शक्यता जुळून आल्या तर पाकिस्तान अजूनही सेमी फायनलमध्ये जाऊ शकतो. परंतु तज्ज्ञांच्या मते या सर्व शक्यता जुळून येण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.