PHOTO | टीम इंडियाची गेल्या 20 वर्षातील कसोटी सामन्यांमधील निच्चांकी धावसंख्या

| Updated on: Dec 20, 2020 | 1:06 PM

अ‌ॅडिलेड कसोटीचा अपवाद वगळता टीम इंडियाने 2000 पासून कसोटी सामन्यात 4 वेळा निच्चांकी धावा केल्या आहेत.

1 / 5
 अ‌ॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने अवघ्या 36 धावाच केल्या. यासह कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र टीम इंडिया कसोटीत निच्चांक धावसंख्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकूण 4 वेळा विरोधी संघांनी  टीम इंडियाचा कसोटीत 100 किंवा त्याआधी डाव गुंडाळला आहे.

अ‌ॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने अवघ्या 36 धावाच केल्या. यासह कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र टीम इंडिया कसोटीत निच्चांक धावसंख्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकूण 4 वेळा विरोधी संघांनी टीम इंडियाचा कसोटीत 100 किंवा त्याआधी डाव गुंडाळला आहे.

2 / 5
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला 100 धावाच करता आल्या. म्हणजेच टीम इंडिया 100 धावावंर ऑल आऊट झाली.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला 100 धावाच करता आल्या. म्हणजेच टीम इंडिया 100 धावावंर ऑल आऊट झाली.

3 / 5
न्यूझीलंड विरुद्ध 2002 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया 99 धावावंर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

न्यूझीलंड विरुद्ध 2002 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया 99 धावावंर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

4 / 5
टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 व्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हारकिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 94 धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 224 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा कसोटीतील तिसरा मोठा पराभव ठरला.

टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 व्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हारकिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 94 धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 224 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा कसोटीतील तिसरा मोठा पराभव ठरला.

5 / 5
टीम इंडियाने केवळ परदेशातच निच्चांकी धावा केल्या, असं नाही. टीम इंडियाने भारतातही निच्चांकी धावसंख्या केली आहे. भारताने 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात निराशाजनक कामगिरी केली होती. टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट टाकल्या. यामुळे टीम इंडिया अवघ्या  76 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 90 धावांनी विजय झाला होता.

टीम इंडियाने केवळ परदेशातच निच्चांकी धावा केल्या, असं नाही. टीम इंडियाने भारतातही निच्चांकी धावसंख्या केली आहे. भारताने 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात निराशाजनक कामगिरी केली होती. टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट टाकल्या. यामुळे टीम इंडिया अवघ्या 76 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 90 धावांनी विजय झाला होता.