
नाशिक नांदगावमध्ये उभ्या पिकात जनावरं सोडली आहेत. हा प्रकार नांदगावच्या लक्ष्मीनगरमधील आहे. जनावरांचा चाऱ्याच प्रश्न बनला बिकट बनत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

पावसाने ओढ दिल्याने उभी पीकं करपू लागली आहेत. तर जनावरांचा चारा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील एका शेतकऱ्याने पावसाअभावी करपलेल्या उभ्या पिकात जनावरे सोडली आहे.

पाऊस न पडल्याने खरीप सीजन हातचा गेला आहे. दुबार पेरणीची वेळही त्यात आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून किमान जनावरांच्या चाऱ्यासाठी तरी पाऊस पडावा अशी बळीराजा आस लावून बसला आहे.