या 4 अभिनेत्रींचा झाला दुर्दैवी अंत, शेवटच्या अभिनेत्रींची कहाणी ऐकून आजही अंगावर येतो काटा
रुपेरी पडद्यावर गाजल्या, पण आयुष्याचा शेवट ठरला खूपच वेदनादायी. या अभिनेत्रींच्या निधनाने हादरलं होतं बॉलिवूड. शेवटची तर प्रचंड चर्चेत. आजही कहाणी ऐकून अंगावर येतो काटा.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणाऱ्या अनेक अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लोकप्रियता मिळवलेल्या काही अभिनेत्रींच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत दुःखद ठरला. त्यामधील दुसऱ्या नंबरची अभिनेत्रीची कहाणी ऐकून थर-थर कापते अंग.
बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत अढळ स्थान निर्माण केलं. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेलं होतं. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणावांदरम्यान त्यांना मद्यपानाचं व्यसन लागल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास झाला. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
40 आणि 50च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अचला सचदेव. अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पतीच्या निधनानंतर त्या तुलनेने एकट्या पडल्या होत्या. त्यांच्या शेवटच्या काळाबाबत विविध माध्यमांमध्ये एकटेपणाच्या आणि आरोग्याशी संबंधित अडचणींच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. अखेर 2012 मध्ये पुण्यात त्यांचं निधन झालं.
अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिव्या भारती यांच्या कारकिर्दीचा प्रवास अत्यंत वेगवान होता. मात्र 5 एप्रिल 1993 रोजी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या राहत्या इमारतीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामागील नेमक्या परिस्थितीबाबत अनेक वर्षे चर्चा होत राहिली.
अनेक चित्रपटांतील स्टार अभिनेत्री परवीन बाबी यांनी आपल्या फॅशनने बॉलिवूडमध्ये क्रांती घडवली. लोक त्यांच्या ग्लॅमरस शैलीने मोहित झाले होते. परवीन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार होता असे म्हटले जाते. 2005 मध्ये त्यांचा मृतदेह जुहू रिव्हिएरा येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सापडला होता.