Champions Trophy 2025 : एकही मॅच न खेळता हे खेळाडू ठरले चॅम्पियन, तिसरं नाव वाचाल तर
टीम इंडियाने केवळ 12 खेळाडूंसह संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तीन खेळाडू संपूर्ण स्पर्धेबाहेर बसले, यानंतरही त्यांना चॅम्पियन म्हटले जाईल. कोण आहेत ते खेळाडू ?

टीम इंडियाचा खेळ पाहून चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता भारतीय संघच असेल याची अनेकांना खात्री होती. भारतीय संघाने एकापाठोपाठ एक सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून टीम इंडिया चॅम्पियन बनली. (Photos : Social Media)

यादरम्यान टीम इंडियाचे असे 3 खेळाडू आहेत, ज्यांनी एकही सामना खेळला नाही, पण तरीही ते चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते ठरले आहेत. यालाच कदाचित नशीब म्हणतात. या 3 खेळाडूंनी एकही सामना खेळला नसला तरी त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती.

BCCI ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेतेपदासाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी संघात 15 खेळाडू होते. नंतर बदल करण्यात आला. याआधी जसप्रीत बुमराह संघात होता पण तो दुखापतीतून सावरला नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणाने टीम इंडियात अचानक एंट्री केली.

तसेच वरुण चक्रवर्तीने यशस्वी जैस्वालला हटवून संघात स्थान मिळवले. त्यानंतर खेळाडूंची संख्या केवळ 15 राहिली.

टीम इंडियाने संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 सामने खेळले आणि यादरम्यान 12 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. म्हणजेच 3 खेळाडू एकही सामना खेळू शकले नाहीत.

ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि अर्शदीप या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. भारताने आपल्या संघात पाच फिरकीपटूंना संधी दिली. ज्यामध्ये वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल खेळले.

या खेळाडूंनी एवढी चांगली कामगिरी केली की पहिल्याच सामन्यात विकेटकीपर म्हणून केएल राहुलला खेळण्याची गरज नव्हती. त्यानेही चमकदार कामगिरी केली. त्यानंतर संघात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.