Virat Kohli : या कारणामुळे विराट कोहलीने घेतली निवृत्ती; रवी शास्त्री यांनी सांगितली Inside Story

Virat Kohli Test Retirement : भारताचा माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, कोहली अजून दोन ते तीन वर्षे क्रिकेट खेळला असता, पण त्याने थांबण्याचा निर्णय घेतला असे ते शास्त्री म्हणाले.. त्यांनी या निवृत्तीची इनसाईड स्टोरी सांगितली...

| Updated on: May 16, 2025 | 4:13 PM
1 / 8
Ravi Shastri Reveals Kohli Retirement Truth : भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री हे कोहलीचे प्रशंसक आहेत. कोहलीच्या कसोटीतील निवृत्तीने आपल्याला धक्का बसला. मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे अजून आरामात खेळेल, अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.

Ravi Shastri Reveals Kohli Retirement Truth : भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री हे कोहलीचे प्रशंसक आहेत. कोहलीच्या कसोटीतील निवृत्तीने आपल्याला धक्का बसला. मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे अजून आरामात खेळेल, अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.

2 / 8
शास्त्री यांनी सांगितले की विराटने संन्यास घेण्यापूर्वीच दोघांमध्ये चर्चा झाली होती.  एक आठवड्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे विचार आणि निर्णय स्पष्ट होता. त्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच पश्चाताप नव्हता.

शास्त्री यांनी सांगितले की विराटने संन्यास घेण्यापूर्वीच दोघांमध्ये चर्चा झाली होती. एक आठवड्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे विचार आणि निर्णय स्पष्ट होता. त्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच पश्चाताप नव्हता.

3 / 8
शास्त्री हे  ICC चा खास शो आयसीसी रिव्ह्यूमध्ये चर्चा करत होते. त्यांनी कोहलीने का निवृत्ती स्वीकारली याची माहिती दिली. निवड समिती अथवा हेड कोच गौतम गंभीर सोबत त्याचे काही मुद्दांवर पटले नाही यामुळे त्याने निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे.

शास्त्री हे ICC चा खास शो आयसीसी रिव्ह्यूमध्ये चर्चा करत होते. त्यांनी कोहलीने का निवृत्ती स्वीकारली याची माहिती दिली. निवड समिती अथवा हेड कोच गौतम गंभीर सोबत त्याचे काही मुद्दांवर पटले नाही यामुळे त्याने निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे.

4 / 8
त्याचवेळी शास्त्री यांनी त्यामागील दुसरी बाजू मांडली. विराटने निवृत्ती घेण्याचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. कारण मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे खेळेल. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर शरीराला संदेश जातो. तुम्हाला तर माहितीच आहे, असे शास्त्री म्हणाले.

त्याचवेळी शास्त्री यांनी त्यामागील दुसरी बाजू मांडली. विराटने निवृत्ती घेण्याचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. कारण मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे खेळेल. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर शरीराला संदेश जातो. तुम्हाला तर माहितीच आहे, असे शास्त्री म्हणाले.

5 / 8
संघात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक फिट असू शकता. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर तुमचे शरीर थेट संदेश देते. याशिवाय तुमच्यावर सर्वांच्या अपेक्षा असतील तर तुम्ही नेहमी प्रकाशझोतात राहता, त्याला स्वतःला अधिक थकलेले वाटत होते, असे शास्त्री म्हणाले.

संघात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक फिट असू शकता. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर तुमचे शरीर थेट संदेश देते. याशिवाय तुमच्यावर सर्वांच्या अपेक्षा असतील तर तुम्ही नेहमी प्रकाशझोतात राहता, त्याला स्वतःला अधिक थकलेले वाटत होते, असे शास्त्री म्हणाले.

6 / 8
विराट कोहलीला जगभरातून प्रशंसक मिळाले होते. गेल्या दशकातील कोणत्याही इतर खेळाडूच्या तुलनेत त्याचे चाहते अधिक आहेत. मग हे खेळाडू ऑस्ट्रेलियातील असो वा दक्षिण अफ्रिकेतील अनेक लोक त्याच्या खेळाचे चाहते आहेत, असे शास्त्री म्हणाले.

विराट कोहलीला जगभरातून प्रशंसक मिळाले होते. गेल्या दशकातील कोणत्याही इतर खेळाडूच्या तुलनेत त्याचे चाहते अधिक आहेत. मग हे खेळाडू ऑस्ट्रेलियातील असो वा दक्षिण अफ्रिकेतील अनेक लोक त्याच्या खेळाचे चाहते आहेत, असे शास्त्री म्हणाले.

7 / 8
विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने  46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. त्यात त्याचे 30 शतकांचा समावेश आहे.

विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. त्यात त्याचे 30 शतकांचा समावेश आहे.

8 / 8
कोहलीने टेस्ट फॉर्म्यटमध्ये  68 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यातील 40 मध्ये टीम इंडिया जिंकली आहे. कोणत्याही इतर कर्णधारापेक्षा ही आतापर्यंतची सर्वात मोठी चांगली कामगिरी आहे. कोहली आणि शास्त्री हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कोच-कप्तान ठरलेले आहेत.

कोहलीने टेस्ट फॉर्म्यटमध्ये 68 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यातील 40 मध्ये टीम इंडिया जिंकली आहे. कोणत्याही इतर कर्णधारापेक्षा ही आतापर्यंतची सर्वात मोठी चांगली कामगिरी आहे. कोहली आणि शास्त्री हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कोच-कप्तान ठरलेले आहेत.