पाणी पिणं तर दूरच, या नदीच्या पाण्याला हात लावायलाही घाबरतात लोकं; शापीत नदीची गोष्ट माहीत आहे का ?

भारतात नद्यांना खूप धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असतं. काही नद्या जीवनदायी मानल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. पण आपल्या देशात काही नद्या अशाही आहेत ज्यांना शापित मानलं जातं.

| Updated on: Aug 05, 2025 | 1:30 PM
1 / 6
तुम्ही अशा अनेक नद्यांबद्दल ऐकले असेल ज्यांना पवित्र मानले जाते आणि मोक्ष देतात, असंही म्हटलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला अशा नदीबद्दल सांगणार आहोत जी शापित मानली जाते. या नदीची ना पूजा केली जाते ना लोक त्यात स्नान करतात.

तुम्ही अशा अनेक नद्यांबद्दल ऐकले असेल ज्यांना पवित्र मानले जाते आणि मोक्ष देतात, असंही म्हटलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला अशा नदीबद्दल सांगणार आहोत जी शापित मानली जाते. या नदीची ना पूजा केली जाते ना लोक त्यात स्नान करतात.

2 / 6
गंगा, नर्मदा आणि गोदावरी सारख्या नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं मानलं जातं, परंतु चंबळ नदीच्या बाबतीत असे नाही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून वाहणाऱ्या चंबळ नदीबद्दल असे म्हटले जाते की त्यामध्ये स्नान केल्याने पुण्याऐवजी पाप लागतं.

गंगा, नर्मदा आणि गोदावरी सारख्या नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं मानलं जातं, परंतु चंबळ नदीच्या बाबतीत असे नाही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून वाहणाऱ्या चंबळ नदीबद्दल असे म्हटले जाते की त्यामध्ये स्नान केल्याने पुण्याऐवजी पाप लागतं.

3 / 6
चंबळ नदी शापित होण्यामागे महाभारत काळातील एक कथा आहे, ज्यामुळे तिला गंगा-यमुनेपेक्षा वेगळी रते. असे मानले जाते की एकदा या ठिकाणाचा राजा रती देव याने चंबळ नदीच्या काठावर शेकडो प्राण्यांचा बळी दिला होता.

चंबळ नदी शापित होण्यामागे महाभारत काळातील एक कथा आहे, ज्यामुळे तिला गंगा-यमुनेपेक्षा वेगळी रते. असे मानले जाते की एकदा या ठिकाणाचा राजा रती देव याने चंबळ नदीच्या काठावर शेकडो प्राण्यांचा बळी दिला होता.

4 / 6
असं मानलं जातं की या प्राण्यांच्या बलिदानातून निघणारे रक्त नदीत मिसळले आणि संपूर्ण नदी रक्ताने लाल झाली. तेव्हापासून ती नदी शापित मानली जाते. असे म्हटले जाते की या नदीत स्नान केल्याने जीवनात संकटे येतात.

असं मानलं जातं की या प्राण्यांच्या बलिदानातून निघणारे रक्त नदीत मिसळले आणि संपूर्ण नदी रक्ताने लाल झाली. तेव्हापासून ती नदी शापित मानली जाते. असे म्हटले जाते की या नदीत स्नान केल्याने जीवनात संकटे येतात.

5 / 6
चंबळ नदीच्या शापामागे एक पौराणिक कथा देखील आहे. महाभारत काळात, पांडव हे द्युतामध्ये हरल्यावर कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला आणि ही घटना चंबळ नदीच्या काठावर घडली. तेव्हा संतप्त झालेल्या द्रौपदीने चंबळ नदीला शाप दिला की जो कोणी या नदीचे पाणी पिईल तो सूडाच्या आगीत जळून खाक होईल.

चंबळ नदीच्या शापामागे एक पौराणिक कथा देखील आहे. महाभारत काळात, पांडव हे द्युतामध्ये हरल्यावर कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला आणि ही घटना चंबळ नदीच्या काठावर घडली. तेव्हा संतप्त झालेल्या द्रौपदीने चंबळ नदीला शाप दिला की जो कोणी या नदीचे पाणी पिईल तो सूडाच्या आगीत जळून खाक होईल.

6 / 6
द्रौपदीच्या या शापामुळे लोक चंबळ नदीचे पाणी पिणे आणि त्यात स्नान करणे टाळतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच, शापित असल्यामुळे, चंबळ नदीची पूजा केली जात नाही. काही मान्यतेमध्ये, तिला भूतग्रस्त नदी असेही म्हणतात. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

द्रौपदीच्या या शापामुळे लोक चंबळ नदीचे पाणी पिणे आणि त्यात स्नान करणे टाळतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच, शापित असल्यामुळे, चंबळ नदीची पूजा केली जात नाही. काही मान्यतेमध्ये, तिला भूतग्रस्त नदी असेही म्हणतात. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)