
भारतीय संस्कृतीमध्ये सोने हा मौल्यवान धातू म्हणून ओळखला जातो. सणासुदीला किंवा कोणत्याची आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये स्त्री-पुरुष अंगावर सोने घालतात. ज्या व्यक्तीकडे सर्वाधिक सोने तो व्यक्ती श्रीमंत मानला जातो. पण आजकाल हे सोन्याचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षीपासून सोन्याचे भाव हे सतत भरारी घेताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसमान्यांच्या खिश्याला सोने हे न परवडणारे आहे. आज तर सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे.

आज सराफ बाजारात सोन्याचा भाव 6 हजार 400 रूपयांची वाढला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रूपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दराने मोठ्या घसरणीनंतर आज पुन्हा दरामध्ये उसळी घेतली आहे.

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 667 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 95 हजार 550 रुपयावर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सोने खरेदी करताना सर्वसामान्यांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)