Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी पुढे ढकलण्यात आलेली स्पर्धा यंदा पार पडली. 32 व्या ऑलिम्पिक स्पर्धेची आज अखेर सांगता झाली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 7:42 PM
1 / 6
23 जुलैला सुरु झालेली टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेची (Tokyo Olympic 2020) आज (8 ऑगस्ट) अखेर सांगता झाली. भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक शानदार ठरली. भारताने मागील 6 ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं रेकॉर्ड तोडत यंदा 7 ओलिम्पिक पदकं जिंकली. आज झालेल्या सांगता समारोहाला (Closing Ceremony) पैलवान बजरंग पूनियाने (Bajrang Punia) भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.

23 जुलैला सुरु झालेली टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेची (Tokyo Olympic 2020) आज (8 ऑगस्ट) अखेर सांगता झाली. भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक शानदार ठरली. भारताने मागील 6 ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं रेकॉर्ड तोडत यंदा 7 ओलिम्पिक पदकं जिंकली. आज झालेल्या सांगता समारोहाला (Closing Ceremony) पैलवान बजरंग पूनियाने (Bajrang Punia) भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.

2 / 6

टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहाला संपूर्ण मैदानाला विविध रंगाची रोषणाई करण्यात आली होती. यावेळी समारोहाची सुरुवात भव्यदिव्य आतिषबाजीने करण्यात आली.

3 / 6

सांगता समारोहाला भारतीय पैलवान बजरंग पूनियाने भारताचा तिरंगा हातात घेऊन संघाचे नेतृत्त्व केले. भारतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियानेही कांस्य पदक जिंकलं.

4 / 6

टोक्यो ओलिम्पिक भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. भारताने 4 कांस्य पदकांसह, 2 रौप्य पदकं आणि एक सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे हॉकी पुरुष संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकल. तर एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं.

5 / 6

टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहावेळी भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांवर अप्रतिम कामगिरीमुळे समाधान होतं. यावेळी सेल्फि घेताना पैलवान रवी, बजरंग, दीपक आणि हॉकी संघाची महिला खेळाडू.

6 / 6

टोक्यो ओलिम्पिकच्या सांगता समारोहावेळी सर्व संघाचे खेळाडू एका गोलात उभे असल्याने जणू सर्व जगच एका गोलात सामावल्याचं दिसत होतं. संपूर्ण स्पर्धा कोरोना नियमांचे कडेकोट पालन करुन पार पाडण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us