
खूप कमी लोकांना रेल्वेच्या या सुविधेची माहिती आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना एक तिकीट जारी करते. ज्यात तुम्ही एकाच तिकीटावर तब्बल 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकणार आहात. एकच तिकीट तब्बल 56 दिवस वैध असणार आहे. तुम्हाला वेळोवेळी तिकीट खरेदी करण्याची गरज राहणार नाही. या तिकीटाला सर्क्युलर सेवा तिकीट असे म्हटले जाते. यातून तु्म्ही वेग-वेग मार्गांवर कोणत्याही अडथळ्यांशिवाय 56 दिवस प्रवास करु शकणार आहात.

जर तुम्हाला अनेक ठिकाणांवर प्रवास करायचा असेल किंवा अनेक तीर्थ स्थळांना भेट देण्याची योजना असेल तर तु्म्ही सर्क्युलर तिकीट खरेदी करु शकता. रेल्वेकडून तुम्हाला एक कन्फर्म तिकीट खरेदी करावे लागेल, तिकीट सर्क्युलर यात्रेसाठी असायला हवे. यानंतर तुम्ही 56 दिवसापर्यंत प्रवास करु शकता. कोणत्याही किंवा कोणत्याही क्लाससाठी कोचसाठी सर्क्युलर तिकीट खरेदी शकतो. या तिकीटासाठी कमाल 8 स्टॉपेज निवडण्याची मर्यादा आहे.

indian railway


सर्क्युलर जर्नी तिकीट तुमचा वेळ आणि पैसे दोन्हीची बचत करते,वेगवेगळ्या स्थानकातून तिकीट खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यात तुमचा वेळ देखील वाया जातो. त्यानूसार मग सर्क्युलर प्रवास तिकीट स्वस्त पडते. या तिकिटाचा भाडे टेलिस्कोपिक दरावर ठरत असते. म्हणजे तुम्ही कुठे-कुठे प्रवास करणार आहे त्यावर या तिकिटाचे दर तयार केले जातात. म्हणजे तुम्ही कुठे प्रवास करणार त्यावर तिकीटाचे भाडे ठरणार आहे.

सर्क्युलर प्रवास तिकीट प्रवाशाचा अतिरिक्त खर्च कमी करते. तसेच प्रवासात वेगवेगळ्या स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचविते. प्रत्येक जागी ट्र्रेन तिकीट बुक करण्याच्या कटीकटीतून आपली सुटका करते.