आकांशा – गौरवच नाही, टीव्ही विश्वातील 4 सेलिब्रिटींचे घटस्फोट हैराण करणारे, लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मोडला संसार
झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते. आता देखील अभिनेता आकांश चमोला आणि गौरव खन्ना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. याबद्दल खुद्द आकांशा हिने खुलासा केला. दोघांपूर्वी अन्य सेलिब्रिटींनी देखील त्यांचा अनेक वर्षांचा संसार मोडला आहे... जाणून घ्या त्या सेलिब्रिटींबद्दल...

टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. आकांक्षा चमोलाने नुकतेच 'लॉक अप 2' (Lock Upp 2) या शोमध्ये खुलासा केला की, ती आणि गौरव घटस्फोट घेत आहेत; हे दोघे गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत आहेत.

अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांनी देखील लग्नाच्या अनेक वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2011 मध्ये त्यांनी लग्न केलेलं. घटस्फोटानंतर माही लेकीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे... पण दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलेला.

टीव्हीवरील कलाकार संजीव सेठ आणि लता सभरवाल यांनी 2009 मध्ये लग्न केले. हे दोघेही 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत काम करत होते. मात्र, 15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांचा घटस्फोट देखील चर्चेत राहिला...

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं दोनदा लग्न झालं होतं. तिचे दोन्ही विवाह टिकले नाहीत. तिने 2012 मध्ये तिचा पहिला पती राजा चौधरी आणि 2019 मध्ये तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यापासून घटस्फोट घेतला. आता अभिनेत्री दोन्ही मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. लग्नानंतर सुमारे दोन वर्षांनी, 2014 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर करण याने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत संसार थाटला... दोघांना एक मुलगी देखील आहे.