बाईकचा तुफान वेग, मध्येच दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; वर्ध्यात तिघांचा जागीच मृत्यू!
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात भर दुपारी पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ झाला आहे. रोडवरून दोन दुचाकी वेगात जात होत्या. या दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली आणि यातच तिघांचा मृत्यू झाला.

वर्धा : जिल्ह्यातील पुलगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात झाला आहे. दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चुरा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात भर दुपारी पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ झाला आहे. रोडवरून दोन दुचाकी वेगात जात होत्या. या दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली आणि यातच तिघांचा मृत्यू झाला.

एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. भर उन्हात दोन्ही दुचाकींमध्य झालेली ही धडक खूपच भीषण होती. अपघाताच्या घटनेची माहिती होताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळीधाव घेतली.

मृतदेह रुग्णालयात पाठवले आले असून शवविच्छेदन केले जाणार आहे. जळगावमध्येही अशाच प्रकारचा अपघात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात बस-कार आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की यात एकूण सहा जण जागीच ठार झाले. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा दावा बसचालकाने केला आहे. दरम्यान, या दोन्ही अपघातांची भीषणता लक्षात घेता सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले जात आहे.